‘एलबीपीएम’ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती आणि हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम
सोलापूर √ भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्वातंत्र्याचा ‘गांधीराज’ मिळवून देताना मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या सोलापूरच्या चार सुपुत्रांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या बलिदानामुळे ब्रिटिश सरकारच्या राजवटीत ‘मार्शल लॉ’ची अंमलबजावणी करण्यात आलेलं एकमेव शहर अशी सोलापूराची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले.
सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती व हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिन हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने डॉ. दशरथ रसाळ यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला प्रारंभी प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि सोलापुरातील चार हुतात्म्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य प्रा. देवराव मुंडे, डॉ. अनिल कांबळे, डॉ. विजय रेवजे, प्रा. भक्तराज जाधव, प्रा. निलोफर तांबोळी, डॉ. प्रदीप जगताप, प्रा. संतोष मारकवाड, डॉ. अशोक भोंग, प्रा. शैलेंद्र सोनावले, प्रा. नितेश गांगवे, प्रा. अमोल मोरे, प्रा. किरण वाघमोडे आदी उपस्थित होते.