मुंबई : ” ३५० वा शिवराज्याभिषेक ” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे त्यानुषंगाने यापुढे राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार / प्रसिध्दीत तसेच शासकीय पत्रव्यवहारात सदर बोधचिन्हाचा (Logo) वापर करण्यात येणार आहे. ” ३५० वा शिवराज्याभिषेक ” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचा ( Logo ) शासनाच्या सर्व शासकीय कार्यक्रमांच्या प्रचार तसेच प्रसिध्दी बरोबर शासकीय पत्रव्यवहारांत कटाक्षाने वापर करून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात सदर बोधचिन्ह चित्रित करण्यात यावे असा आदेश सर्व प्रशासकीय विभागांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.