वसुंधरा गौरव पुरस्कार जाहिर…

 

सोलापूर √ सामाजिक,साहित्यिक,शैक्षणिक,पत्रकारिता व पर्यावरण अशा विविध क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या व्यक्तिनां वसुंधरा सोशल फौंडेशनच्या वतीने दरवर्षी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते . 

यावर्षी “वसुंधरा गौरव पुरस्कार “सोलापूरातील ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे उर्दू – मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब नल्लामंदू लेखक व व्यंगचित्रकार सतीश वैदय व सोलापूर विकास मंचचेराजेंद्रकुमार निकाळजे, प्रवीण तळे,अशोक कुमार दिलपाक,सलिम पाटेकरी यांना जाहिर करण्यात आला आहे

२० एप्रिल २४ रोजी सकाळी ११ वाजता दलित चळवळीचे संस्थापक अंबादास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने, यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम समाज कल्याण केंद्र सोलापूर येथेसं संपन्न होणार आहे. हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सुसंगम सर्व धर्मीय वधू-वर सूचक मेळाव्यात प्रदान करण्यात येत असून या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक आय.आय.फराश यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *